मान्सून दाखल झाला की वेध लागतात डोंगर-दऱ्या, धबधब्यांमध्ये फिरण्याचे. मोठी सुट्टी न घेता केवळ दोन दिवसात पर्यटन स्थळांकडे फेरफटका मारण्याकडे आपला अधिक ओढा असतो. आज आपण पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या Monsoon Places पाहणार आहोत. दोन दिवसांच्या सुट्टीत ही ट्रिप सहज प्लान करता येऊ शकते.
शिरोटा तलाव..
पुण्यापासून जवळ आणि कमी गर्दीच्या ठिकाणांमध्ये शिराटो तलावाचं नाव घेतलं जातं. या तलावाबद्दल फार लोकांना माहिती नाही. त्यामुळे येथे कमी गर्दी असते. पावसाळ्यानंतरही तर येथील दृश्य पाहण्यासारखं असतं. येथे कॅम्पिंगही केलं जाते. हा तलाव लोणावळ्याजवळ आहे. शिरोटा तलाव लोणावळ्यापासून साधारण १८ किलोमीटर तर पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावरील आहे.
शिरोटा तलाव
गिरीवन...
गिरीवन हे एक खासगी हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून अंदाजे २४०० फूट उंचावर आहे. येथील निसर्गसौंदर्य मोहून टाकतं. येथे अनेक खासगी रिसॉर्टही आहेत. येथील ट्रेकिंग आणि राहण्याची उत्तम सोय आहे. पुण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण एकदिवसीय ट्रिपसाठी फायदेशीर आहे.
गिरीवन...
विसापूर किल्ला...
विसापूर किल्ला हिरवळीने वेढलेला आहे. याच्या चहुबाजूंनी पर्वतरांगा आहेत. पावसाळ्यात हा किल्ला आणखी सुंदर दिसतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल, परंतु तुम्हाला गर्दी दिसणार नाही. पायऱ्यांवरुन कोसळणारे पाणी खूप सुंदर दिसते. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. पुण्यापासून साधारण ७५ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर या किल्ल्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता.
विसापूर किल्ला...
घनगड किल्ला...
येथे तुम्ही पावसाळ्यात कॅम्पिंग करू शकता. येथे 'गर्जाई' देवीचे मंदिर, किल्ले आणि गुहा यासारख्या काही ठिकाणांना भेट देऊ शकता. जर तुम्ही लोणावळा-खंडाळ्याहून येत असाल तर तुम्हाला ३० किमी आणि पुण्याहून १०० किमी अंतर प्रवास करावा लागेल. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे.
घनगड
ही एक किंवा दोन दिवसांची ट्रिप तुमच्या कामाचा थकवा दूर करेल आणि तुम्हाला तजेलदार बनवेल हे नक्की...