वैष्णवी हगवणे प्रकरणात आता आणखी एक ट्वीस्ट आला आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावरच हगवणे कुटुंबीयांच्या वकीलाने शिंतोडे उडवले होते. त्यानंतर वैष्णवीच्या वडीलांनी पत्रकार परिषद घेत, हे सर्व आरोप फेटाळले आहेत. शिवाय याच वेळी त्यांनी एक मोठी गोष्ट सर्वां समोर आणली. ते या पत्रकार परिषदेत बोलत असताना, वैष्णवीची आधी दोन लग्न तुटली होती अशी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या या माहितीनंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या. पण ही लग्न का तुटली याचे कारण ही त्यांनी लगेचच सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शशांक हगवणे याच्या बरोबर लग्न होण्या आधी वैष्णवीची दोन लग्न तुटली होती. त्या लग्नात अडथळे आणले गेले होते. त्यामुळे मुलीच लग्न आपल्याला जबरदस्तीने करावं लागलं. त्यासाठी हगवणे कुटुंबाने जे जे मागितलं ते ते आपण त्यांना दिलं. सोन्याची मागणी केली. त्यावेळी सोनं दिलं. चांदीच्या ताटांची मागणी केली ते ही दिलं. मुलीच्या लग्नात कोणत ही विघ्न नको म्हणून हगवणे कुटुंबाच्या प्रत्येक मागण्या आपण पूर्ण केल्या होत्या असं वैष्णवीच्या वडीलांनी स्पष्ट केलं. परत काही तरी नको व्हायला याची चिंता आपल्याला होती असं ही ते म्हणाले.
ही लग्न का मोडली याबाबतही वैष्णवीच्या वडीलांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना या मागे हगवणेच होते असं सांगत अधिक बोलणं त्यांनी टाळलं. हे प्रकरण आता कोर्टात आहे. पोलिस ही याचा तपास करत आहेत. त्यामुळे यावर आता अधिक बोलणे योग्य ठरणार नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. तपासात आणि कोर्टात याबाबी समोर येतीलच असे ही त्यांनी सांगितले. दरम्यान मृत्यू आधी वैष्णवीला सात ते आठ दिवस मारहाण केली जात होती असे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय आपल्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं बंद करा अशी विनंतही त्यांनी यावेळी केली.
वैष्णवीच्या चारित्र्यावरच भर कोर्टात संशय घेतला गेला. त्यानंतर वैष्णवीच्या वडीलांनी प्रसार माध्यमां समोर येत सर्व आरोप फेटाळले आहे. शिवाय लेकीच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या कृतीचा त्यांनी निषेध केला. हे सर्व थांबवा. मुलगी तर हातून गेली. आता तिची बदनामी करू नका, असं हात जोडून सांगताना तिचे वडील भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले. शिवाय त्यांनी हगवणे कुटुंब आपल्या बरोबर कसे वागले याचा पाढाच माध्यमां समोर मांडला. त्यात काही धक्कादायक गोष्टी ही त्यांनी सर्वां समोर आणल्या आहेत.