Pune News: अंदमानच्या काळकोठडीत घुमला 'भारत माता की जय'चा नाद; पुण्यातल्या मुलांची सावरकरांना अनोखी संगीतांजली

Musical Tribute to Veer Savarkar at Andaman Cellular Jail : पुण्यातील 'स्वरतरंग संगीत अकादमी'ने अंदमानच्या सेल्युलर जेल येथे थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना संगीतमय आदरांजली अर्पण केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Musical Tribute to Veer Savarkar : अंदमानच्या सेल्युलर जेलच्या ऐतिहासिक प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.
पुणे:

Musical Tribute to Veer Savarkar at Andaman Cellular Jail : एका अत्यंत हृदयस्पर्शी आणि ऐतिहासिक सांस्कृतिक सोहळ्यात, पुण्यातील 'स्वरतरंग संगीत अकादमी'ने अंदमानच्या सेल्युलर जेल येथे थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना संगीतमय आदरांजली अर्पण केली. ज्या पवित्र स्थानी सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमानवीय यातना सोसल्या, त्याच ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना प्रज्वलित केली.

'बाल मुखातून सावरकर' या शीर्षकाखाली सादर झालेल्या या अनोख्या कार्यक्रमात 8 ते 14 वयोगटातील सुमारे 30 बालकलाकारांनी त्यांच्या पालकांसह सहभाग घेतला. सेल्युलर जेलचे ऐतिहासिक प्रांगण सुमारे 200 हून अधिक उपस्थितांच्या साक्षीने भक्ती, देशप्रेम आणि उत्कट भावनांनी ओथंबून गेले होते.

सावरकरांच्या जीवनप्रवासाचे भावपूर्ण सादरीकरण

संगीत, निवेदन आणि भावपूर्ण सादरीकरणाच्या माध्यमातून या बालकलाकारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकारक कार्यापासून ते अंदमानच्या काळकोठडीत सोसलेल्या कठोर कारावासापर्यंतच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे संगीतमय सादरीकरण केले. या सर्व गीतरचना प्राजक्ता जहागीरदार (संस्थापिका, स्वरतरंग संगीत अकादमी) यांनी संकल्पित आणि दिग्दर्शित केल्या होत्या.

कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि संध्याकाळच्या मंद प्रकाशात उजळलेल्या सेल्युलर जेलच्या भिंतींनी या प्रसंगाला एक विशेष दिव्यता प्रदान केली.

या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राजक्ता जहागीरदार म्हणाल्या, “हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर ती एक तीर्थयात्रा होती. वीर सावरकरांना अर्पण केलेली ही एक संगीतप्रार्थना आहे. ज्या ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले, त्या ठिकाणी आपल्या मुलांनी 'भारत मातेच्या जयघोषात' गाणे सादर करणे हे आमच्यासाठी सन्मान आणि जबाबदारी दोन्ही आहे.”

Advertisement

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून अंदमान आणि निकोबार प्रशासनातील मत्स्यव्यवसाय संचालक तसेच पर्यटन आणि कृषी विभागाच्या संयुक्त सचिव, श्रीमती कल्याणी राजेंद्र जगताप उपस्थित होत्या.

( नक्की वाचा : Pune News: मोहोळांची संपत्ती 400 पट वाढली? 'पांढऱ्या इनोव्हाचा उल्लेख करत धंगेकरांचा नवा बॉम्ब, पुण्यात खळबळ )
 

त्यांनी अकादमीच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, “सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी संगीतसंस्काराच्या माध्यमातून स्वरतरंग संगीत अकादमी जो प्रयत्न करीत आहे, तो खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे.”

Advertisement

या निरागस आवाजांनी सेल्युलर जेलचा परिसर देशभक्तीच्या प्रतिध्वनींनी भरून गेला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चेतविलेली ती ज्योत आजही प्रेरणेचा अखंड प्रकाश देत आहे, याचा अनुभव उपस्थितांना आला.

विशेष म्हणजे, स्वरतरंग संगीत अकादमी ही अयोध्येतील राममंदिरात 'गीतरामायण' सादर करणारी भारतातील पहिली संस्था ठरली आहे. त्यांची ही अभिमानास्पद कामगिरी संपूर्ण देशात गाजली. सेल्युलर जेलमधील ही 'संगीतांजली' अकादमीच्या ध्येययात्रेतील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरली आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article