Kumar Saptarshi: ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; पुरोगामी चळवळीतील हक्काचा आवाज हरपला

Kumar Saptarshi Passed Away: ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kumar Saptarshi Passed Away: . 1970 च्या दशकात त्यांनी पुण्यातून 'युवक क्रांती दल' (युक्रांद) ची स्थापना केली.
पुणे:

Kumar Saptarshi Passed Away: ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका  सामाजिक आणि राजकीय पर्वाचा अंत झाला असून, संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सप्तर्षी यांच्या कार्याचा परिचय

महाराष्ट्र आणि देशाच्या सामाजिक-राजकीय पटलावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या डॉ. कुमार सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला होता. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या कुमार सप्तर्षी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकारणासाठी वाहिले. 1970 च्या दशकात त्यांनी पुण्यातून 'युवक क्रांती दल' (युक्रांद) या पुरोगामी आणि विद्यार्थी-केंद्रित सामाजिक-राजकीय चळवळीची स्थापना केली होती. या चळवळीने राज्यातील तरुणांना एकत्र आणून सामाजिक न्यायासाठी लढण्याची एक नवी दिशा दिली.

Advertisement

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग

डॉ. कुमार सप्तर्षी हे प्रख्यात समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कट्टर पाठीराखे होते. त्यांनी आयुष्यभर जातीवाद, विषमता आणि सामाजिक अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला. ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या 'संपूर्ण क्रांती' आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक चळवळींसोबतच त्यांनी 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकाचे संपादन करत त्यांचे पुरोगामी विचार सातत्याने मांडले.

कुमार सप्तर्षी यांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. या माध्यमातून त्यांनी गांधीवादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम केले. सामाजिक कार्यकर्त्यासोबतच त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) म्हणूनही काम केले होते. 

रोहित पवार यांच्याकडून शोक

त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 

समाज एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना, द्वेष, हिंसा आणि आर्थिक विषमता यासारख्या प्रवृत्ती बळावत असताना ग्रामीण विकासाचा, मानवतेचा आणि गांधीवादाचा विचार घेऊन चालणारे डॉ. कुमार सप्तर्षी सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे ही खूप मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article