Virat Kohli Post: '18 वर्ष वाट पाहायला लावलीस मित्रा...', ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटची हृदयस्पर्शी पोस्ट!

Virat Kohli Instagram Post: ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Virat Kohli Emotional Post: आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 वर्षांनंतर ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या या विजयानंतर आरसीबीच्या चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीलाही अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे विराट कोहलीची पोस्ट?

"या संघाने स्वप्न साकार केले, असा सीझन मी कधीही विसरणार नाही. गेल्या अडीच महिन्यांत आम्ही या प्रवासाचा भरपुर आनंद घेतला आहे. हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे ज्यांनी कधीही वाईट काळात आमची साथ सोडली नाही. हा विजय इतक्या वर्षांच्या हार्ट ब्रेक आणि निराशेसाठी आहे. हे या संघासाठी खेळताना मैदानावर घेतलेल्या प्रत्येक प्रयत्नांसाठी आहे, असे विराट कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आयपीएल ट्रॉफीबद्दल काय बोलू? तू मला १८ वर्षे वाट पाहायला लावलीस  की मी तुला उचलू शकेन  माझ्या मित्रा, पण ही वाट पाहण्यासारखी होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. या पोस्टसोबतच विराट कोहलीने आयपीएलच्या ट्रॉफीसोबत केलेले खास फोटोशूटही शेअर केले आहे. त्याची ही काळजाला भिडणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून आरसीबीच्या चाहत्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. 

दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीने  190 धावांचा मोठा स्कोअर केला. आरसीबीच्या एकाही खेळाडूने अर्धशतक झळकावले नाही हे तरीही संघ 190 धावसंख्या गाठू शकला. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 184 धावा करू शकला.

RCB Captains : 18 वर्षात दिग्गजांना जमलं नाही ते पाटीदारने करुन दाखवलं; RCB चे आतापर्यंतचे 8 कर्णधार