फक्त 1.3 सेकंदाच्या अंतरानं वाचला होता सुपरस्टारचा जीव! 27 वर्षांपूर्वी 'त्या' दृश्यानं उडवली होती खळबळ

जाहिरात
Read Time: 2 mins
Aamir Khan :1.3 सेकंदाच्या अंतरानं वाचला होता आमिरचा जीव
मुंबई:

काही चित्रपट त्यामधील थरारक दृश्यांमुळे लक्षात राहतात. आमिर खानची मुख्य भूमिका असलेला 'गुलाम' हा यापैकी एक चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन  27 वर्षे झाली आहेत. विक्रम भट्ट दिग्दर्शित 'गुलाम' मध्ये आमिर खान, राणी मुखर्जी, शरत सक्सेना आणि दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत होते. पण सिद्धार्थ 'सिद्धू' मराठेच्या भूमिकेत आमिरने अप्रतिम काम केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

टगुलाम'चे बजेट सुमारे सात कोटी रुपये होते, तर या चित्रपटाने 24 कोटी रुपयांची कमाई केली. 'गुलाम' 19 जून 1998 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाण्यांपासून ते ॲक्शन सीनपर्यंत सर्व काही चर्चेत राहिले. 'गुलाम' चित्रपटातील एक असा सीन होता जो खूप लोकप्रिय झाला आणि त्याने पुरस्कारही जिंकला.

या चित्रपटातील एक असा सीनमध्ये आमिर रेल्वे ट्रॅकवर वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने धावतो. त्यावेळी प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड चांगलीच वाढलेली असते.  या सीनमध्ये आमिर ट्रेनपासून काही फुटांवर उडी मारून आपला जीव वाचवतो. विशेष म्हणजे ट्रेन आणि आमिर यांच्यातील अंतर फक्त 1.3 सेकंदांचे होते. हा स्टंट आमिरने स्वतः केला होता, ज्याने सिनेमाच्या इतिहासात एक खास स्थान निर्माण केले.

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )

Advertisement

'तो वेडेपणा होता'

44 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये या सीनला 'बेस्ट सीन'चा पुरस्कार मिळाला. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी आमिरच्या धैर्याचे खूप कौतुक केले, परंतु नंतर आमिरने स्वतः या धोक्याला 'वेडेपणा' म्हटले. एका मुलाखतीत आमिरनं सांगितलं की, 'हा एक अनावश्यक धोका होता. मी नशीबवान होतो की सर्व काही ठीक झाले, पण हे पुन्हा करणे चुकीचे ठरले असते.'
 

Topics mentioned in this article