Sunjay Kapur Death : करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. संजय कपूर यांच्या अचानक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. संजय यांना लंडनमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता संजय कपूर यांच्या निधनानंतर एक नवीन माहिती समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय कपूर यांचे शेवटचे शब्द काय होते?
खरं तर, संजय कपूर यांनी मरण्यापूर्वी जे काही सांगितले, कदाचित तीच त्यांच्या मृत्यूची कहाणी बनली. संजय कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते लंडनमध्ये पोलो खेळत होते. 'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, पोलो खेळत असताना संजय यांच्या तोंडात एक मधमाशी गेली होती, जी त्यांनी गिळली.
मधमाशी गिळल्यानंतर संजय यांना वाटले की त्यांनी काहीतरी गिळले आहे, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मधमाशीने डंख मारला, ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडायला लागली. जवळ उभ्या असलेल्या लोकांनी सांगितले की, संजय कपूर यांचे शेवटचे शब्द हेच होते की, "मी कदाचित काहीतरी गिळले आहे." मधमाशीच्या डंखामुळे त्यांना अॅलर्जी झाली, ज्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
( नक्की वाचा : Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा? )
कसे होते वैयक्तिक आयुष्य?
संजय कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असत. त्यांनी एकूण तीन विवाह केले होते. संजय यांची पहिली पत्नी नंदिनी महातनी एक फॅशन डिझायनर होती. दोघांनी 1996 मध्ये लग्न केले होते, मात्र नंदिनी आणि संजय यांच्यातील हे नाते फक्त 4 वर्षे टिकले आणि त्यानंतर दोघे वेगळे झाले.
यानंतर तीन वर्षांनी, 2003 मध्ये संजय कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केले. लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2016 मध्ये दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. त्यावेळी मुलांच्या ताब्यासाठी हे जोडपे अनेक दिवस कोर्टात एकमेकांविरुद्ध लढत राहिले. यानंतर संजय यांनी प्रिया सचदेवा नावाच्या मुलीशी लग्न केले. हे त्यांचे तिसरे लग्न होते.