Sharmila Tagore: बड्या पडद्यावरील 'शर्मिला' खऱ्या आयुष्यात 'आयशा' कशा झाल्या? लेकीनं उघड केले गुपित

Soha Ali Khan Opens Up About Sharmila Tagore's Conversion to Islam : हा अली खानने एका मुलाखतीत तिच्या आईच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी उघड केल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Soha Ali Khan : सोहा अली खाननं आईच्या आयुष्यातील खास गोष्टी सांगितल्या आहेत.
मुंबई:

Soha Ali Khan Opens Up About Sharmila Tagore's Conversion to Islam : शर्मिला टागोर यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळख आहे. शर्मिला त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. नुकतेच, त्यांची मुलगी सोहा अली खानने एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी उघड केल्या आहेत. सोहाने सांगितले की, शर्मिला टागोर यांनी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांच्याशी विवाह करण्यापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

धर्मपरिवर्तन आणि नाव

सोहा अली खानने 'हाउटरफ्लाई' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिच्या आई-वडिलांच्या लग्नात कधीच कोणताही मोठा अडथळा आला नाही. तिने सांगितले की, शर्मिला टागोर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांचे नाव 'आयशा' ठेवले. सोहाच्या म्हणण्यानुसार, त्यांची आई कधीकधी 'आयशा' आणि कधीकधी 'शर्मिला' अशी सही करायची, ज्यामुळे त्यांच्या घरात गोंधळ निर्माण व्हायचा. मात्र, त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीत त्यांना शर्मिला टागोर म्हणूनच ओळख मिळाली, त्यामुळे आजही लोक त्यांना त्याच नावाने ओळखतात. परंतु, त्या 'आयशा' देखील आहेत, असे सोहाने स्पष्ट केले.

याआधी, सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये, मनसूर अली खान पटौदी यांनीही याचा उल्लेख केला होता की, त्यांनीच शर्मिला टागोर यांना 'आयशा' हे नाव सुचवले होते. शर्मिला यांनीही कबूल केले होते की, धर्म बदलणे सोपे किंवा खूप अवघडही नव्हते. त्याआधी त्या फार धार्मिक नव्हत्या, पण या अनुभवानंतर त्यांना हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांबद्दल अधिक माहिती मिळाली.

( नक्की वाचा : Sunjay Kapur : 'माझ्यावर ओरडू नका...' 30,000 कोटींसाठी करिश्मा आणि प्रियाच्या वकिलांची कोर्टात जुगलबंदी,Video )
 

लग्नाच्यावेळी झाली टीका

शर्मिला टागोर आणि मनसूर अली खान पटौदी यांचे लग्न 27 डिसेंबर 1968 रोजी झाले. त्या काळात आंतरधर्मीय विवाहाकडे समाज फारसा सकारात्मक दृष्टीने पाहत नव्हता. सोहा अली खानने सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नाला स्वीकारले असले तरी, समाजातून त्यांना खूप टीकेला सामोरे जावे लागले.

Advertisement

शर्मिला टागोर यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्यांचे लग्न निश्चित झाले, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांना कोलकात्यामधून धमक्यांचे मेसेज येत होते, ज्यात 'गोळ्या बोलतील' असे लिहिले होते. या घटनेमुळे पटौदी कुटुंबही थोडे चिंतेत होते.

या सर्व अडचणी असूनही, शर्मिला टागोर आणि मनसूर अली खान पटौदी यांनी त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवला आणि त्यांचा विवाह यशस्वी करून दाखवला. सोहा अली खानने तिच्या आईबद्दल बोलताना सांगितले की, शर्मिला टागोर यांनी नेहमीच स्वतःच्या अटींवर आयुष्य जगले आहे. त्यांचे हे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Divya Bharti : दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य 30 वर्षांनंतर उघड, सहकलाकारानं सोडलं मौन )