Sunjay Kapur : लग्नानंतरही अभिषेकला विसरली नव्हती करिश्मा! संजय कपूरनं माजी पत्नीवर केले होते गंभीर आरोप

Sunjay Kapur Shocking allegation : संजय कपूर यांनी माजी पत्नी करिश्मा कपूरवर गंभीर आरोप केले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sunjay Kapur : संजय कपूर यांच्या आरोपानं करिश्मा आणि अभिषेक यांचं रिलेशन पुन्हा चर्चेत आलं होतं.
मुंबई:

Karisma Kapoor ex husband Sunjay Kapur Shocking allegation : चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती, व्यावसायिक संजय कपूर यांचे 12 जून, 2025 रोजी हार्ट अटॅकमुळे निधन झाले. ते ब्रिटनमध्ये पोलो खेळत असताना ही दु:खद घटना घडली. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? याबाबत चर्चा सुरु आहे. पण, 53 वर्षांच्या संजय कपूर यांच्या अकाली निधनाने मनोरंजन आणि व्यापार जगाला धक्का बसला आहे. या दुःखद बातमीदरम्यान, संजय कपूर यांच्याशी संबंधित अनेक जुने किस्से इंटरनेटवर पुन्हा समोर येऊ लागले आहेत. 2016 मध्ये त्यांच्या घटस्फोटादरम्यान त्यांनी त्यांची माजी पत्नी करिश्मा कपूर यांच्यावर केलेल्या धक्कादायक आरोपांची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

करिश्मा आणि अभिषेकचे नाते काय होते? ( Karisma Kapoor Abhishek Bachchan Relation)

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी 2003 साली लग्न केले होते. त्यांच्या लग्नानं बॉलिवूडला चांगलाच धक्का बसला होता. कारण, , अभिषेक बच्चनसोबतचा तिचा साखरपुडा मोडल्यानंतर काही काळानंतरच करिश्मानं संजयशी लग्न केलं होतं. 

Advertisement

बच्चन आणि कपूर हे चित्रपट सृष्टीतील दिग्गज कुटुंब आहे. अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही काळातच हे नाते संपुष्टात आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. कॉस्मोपॉलिटनच्या एका रिपोर्टनुसार, करिश्माची आई बबिता कपूर हे लग्न तुटण्याचे कारण ठरल्या.

Advertisement

Advertisement

( नक्की वाचा :  Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा? )


 संजय कपूरनं काय केले होते आरोप?

करिश्माने संजयशी लग्न केले, पण काही वर्षांनंतर ते वेगळे झाले. ती आपल्या मुलांसोबत मुंबईला परतली आणि 2014 साली घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा संजयने करिश्मावर काही गंभीर आरोप केले. मुंबई मिररनुसार, संजयने आरोप केला की करिश्माने त्यांच्या मालमत्तेसाठी त्यांच्याशी लग्न केले. त्यांनी असाही आरोप केला की अभिषेकसोबतच्या तिच्या तुटलेल्या नात्यातून सावरण्यासाठी तिने त्यांना 'रिबाउंड' म्हणून वापरले. करिश्माने कुटुंबाला त्यांची मुले समायरा आणि कियान यांना भेटण्यापासून रोखले, असाही आरोप संजय यांनी केला होता.