Who is Leena Tewari: घर नव्हे ताजमहाल! मुंबईतील फ्लॅटची 639 कोटींना विक्री, मालकीण लीना तिवारी आहेत तरी कोण?

Most Expensive Flat Mumbai: मुंबईमधील दोन फ्लॅट्स तब्बल 639 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. कोण आहे ही महागडी घरी घेणारी व्यक्ती? वाचा सविस्तर...

जाहिरात
Read Time: 2 mins

Leena Gandhi Tewari Mumbai Flat: मायानगरी मुंबई हे अब्जाधीशांचे शहर आहे. मोठ्या उद्योगपतींपासून ते सिनेविश्वातील स्टार या शहरात राहतात. मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पाहणे अन् ते पूर्ण करणे म्हणजे दिव्यस्वप्न. मुंबईतील घरांच्या किंमतींची चर्चा नेहमीच होत असते. सध्या मुंबईमधील दोन फ्लॅट्सचा व्यवहार चर्चेत आहे. मुंबईमधील दोन फ्लॅट्स तब्बल 639 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. कोण आहे ही महागडी घरी घेणारी व्यक्ती? वाचा सविस्तर...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 सध्या दक्षिण मुंबईतील वरळी येथे समुद्राभिमुख दोन आलिशान डुप्लेक्स फ्लॅट्सच्या विक्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरेदीदाराने दोन फ्लॅट्ससाठी एकूण 703 रुपये किंमत दिली आहे. या फ्लॅटच्या नोंदणीसाठीच 63.9 कोटी रुपये खर्च करण्यात आले. वरळी सी फेसमधील नमन झानातील दोन फ्लॅट्ससाठी ही किंमत देण्यात आली आहे. या 40 मजली इमारतीच्या 32 व्या आणि 35 व्या मजल्यावर असलेल्या या दोन फ्लॅट्सची विक्री भारतातील सर्वात महागड्या निवासी मालमत्तेची विक्री ठरली आहे.

22,572 चौरस फूटांच्या या फ्लॅटच्या खिडकीतून तुम्हाला समुद्राचे दृश्य दिसते. वरळी परिसर हा मुंबईतील सर्वात पॉश परिसरांपैकी एक आहे. येथे अनेक मोठे सेलिब्रिटी आणि मोठे उद्योगपती राहतात. 639 कोटी रुपयांच्या या फ्लॅटसाठी 63.9 कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी भरण्यात आला आहे. आता जाणून घेऊया हा फ्लॅट कोणी खरेदी केला? हा फ्लॅट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव तुम्हाला माहिती नसेल, पण आम्ही तुम्हाला सांगतो की त्याची गणना देशातील श्रीमंतांमध्ये होते.

नक्की वाचा - Operation Sindoor नंतर वादग्रस्त व्हिडिओ, पुण्याच्या मुलीला बंगाल पोलिसांकडून अटक! AIMIM नेत्यावर आरोप

यूएसव्ही इंडिया या बड्या औषध कंपनीच्या अध्यक्षा लीना तिवारी यांनी हे दोन्ही फ्लॅट खरेदी केले आहेत. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, देशातील सर्वात महागडी निवासी मालमत्ता खरेदी करून लीना तिवारी यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. लीना तिवारी यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये केली जाते. यूएसव्ही इंडिया कंपनीची स्थापना लीनाचे दिवंगत आजोबा विठ्ठल बालकृष्ण गांधी यांनी 1961 मध्ये केली होती. 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असलेल्या लीना मीडिया कॅमेऱ्यांपासून आणि सोशल मीडियापासून दूर राहतात.

दरम्यान, लीना तिवारी यांच्या फार्मा कंपनी भारतातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि मधुमेह औषधांच्या क्षेत्रात पहिल्या पाच कंपन्यांमध्ये आहे. कंपनी सक्रिय औषध घटक (एपीआय), इंजेक्शन आणि बायोसिमिलर औषधे देखील तयार करते. मुंबईत राहणाऱ्या लीना या सार्वजनिक कार्यक्रम आणि पार्ट्यांपासून दूर राहतात. त्या सामाजिक कार्यात बऱ्याच सक्रिय असत्या.

Advertisement