Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव

Ahmedabad Plane Crash News : या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंंत्री विजय रुपाणीसह बहुतेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पण, अहमदाबादमधील एक महिला सुदैवी ठरली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ahmedabad Plane Crash : गणपती बाप्पानं वाचवलं अशी भावना या महिलेनं व्यक्त केली आहे.
मुंबई:

Ahmedabad Plane Crash News :  गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या AI-171 विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान उड्डाणानंतर काही मिनिटांमध्येच खाली कोसळले. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंंत्री विजय रुपाणीसह बहुतेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पण, अहमदाबादमधील एक महिला सुदैवी ठरली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसा वाचला जीव?

भूमी चौहान असं या सुदैवी महिलेचं नाव आहे. त्या याच विमानातून लंडनला जाणार होत्या. अहमदाबादमधील वाहतूक कोंडीमुळे वाचला, हे त्यांचे सुदैव ठरले.वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे त्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 मिनिटे उशिराने पोहोचल्या होत्या. त्यामुळे त्यांना अहमदाबाद-लंडन विमानाची बोर्डिंग करण्याची परवानगी मिळाली नाही. 'नवभारत टाईम्स' नं हे वृत्त दिलं आहे. 

पाय थरथरत होते

भूमी चौहान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्या खूप घाबरल्या, त्यांचे पाय थरथरू लागले. बराच वेळ त्या धक्क्यातच होत्या. चौहान यांनी सांगितले की, फक्त 10 मिनिटे उशीर झाल्यामुळे त्यांचे विमान चुकले होते. त्यांनी सांगितले की, विमान चुकल्यानं त्या दुःखी होऊन विमानतळाच्या एक्झिट गेटवर पोहोचल्या, तेव्हा त्यांना कळले की त्यांनी चुकवलेले विमान अपघातग्रस्त झाले आहे.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय? )
 

गणपती बाप्पांचे आभार 

भूमी चौहान लंडनमध्ये त्यांच्या पतीसोबत राहतात. त्या दोन वर्ष लंडनमध्ये राहिल्यानंतर सुट्ट्यांमध्ये भारतामध्ये आल्या होत्या. त्यांचे पती सध्या ब्रिटनमध्येच आहेत. फक्त 10 मिनिटे उशीर झाल्यानं त्या प्रवास करु शकल्या नाहीत. वाहतूक कोंडीमुळे त्यांना विमानतळावर पोहोचायला उशीर झाला होता. जेव्हा त्यांनी विमान अपघाताची बातमी ऐकली, तेव्हा त्या स्तब्ध झाल्या. 'माझ्या गणपती बाप्पांनी मला वाचवले,' असे त्यांनी म्हटले. विमान चुकल्यानंतर त्या दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी विमानतळावरून परतल्या होत्या.
 

Advertisement