'करार करतानाच माहिती असतं ऑर्डर वेळेवर मिळणार नाही' IAF प्रमुखांचं मोठं वक्तव्य

भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह (IAF Chief Marshal Amar Preet Singh ) यांनी गंभीर माहिती सांगितली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:


भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह (IAF Chief Marshal Amar Preet Singh ) यांनी सीआयआय बिझनेस समिट 2025 मध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे, त्यांनी यावेळी संरक्षण करारांना होत असलेल्या विलंबाबद्दल उघडपणे चिंता व्यक्त केली. एअर चीफ मार्शल म्हणाले, "बऱ्याचदा, करारावर स्वाक्षरी करतानाच आपल्याला माहीत असते की त्या गोष्टी वेळेवर कधीच मिळणार नाहीत. वेळेची मर्यादा हा एक मोठा मुद्दा आहे. मला तर असे वाटते की एकही प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण झालेला नाही. जे वचन पूर्ण होऊ शकत नाही, ते आपण का द्यावे? असा सवाल त्यांनी विचारला 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

83 विमानांपैकी एकही मिळालं नाही

एअर चीफ मार्शल यांनी संरक्षण प्रणालीतील अनेक विलंबांकडे लक्ष वेधले, विशेषतः स्वदेशी प्रकल्पांशी संबंधित प्रकरणांकडे. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) कार्यक्रमाचा संदर्भ देत, वायुसेना प्रमुखांनी सांगितले की तेजस Mk1A फायटर जेटची डिलिव्हरी थांबलेली आहे. याबाबत फेब्रुवारी 2021 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत झाला होता. ऑर्डर केलेल्या 83 विमानांपैकी अद्याप एकही विमान वितरित झालेले नाही. ही डिलिव्हरी मार्च 2024 मध्ये सुरु होणार होती. 

Advertisement

Advertisement

( नक्की वाचा :  Muhammad Yunus : भारताला आव्हान द्यायला निघालेलं युनूस सरकार कोंडीत! बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तांतर? )

महत्त्वाचे संरक्षण करार रखडले

भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनुसार, या विलंबांमुळे अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर परिणाम झाला आहे, ज्यात तेजस Mk1A लढाऊ विमान देखील समाविष्ट आहे, या कराराला 3 वर्षे होऊनही अद्याप जेट्स वितरित झालेले नाहीत. एअर चीफ मार्शल सिंह म्हणाले की तेजस Mk1 च्या वितरणास विलंब होत आहे. तेजस Mk2 चा प्रोटोटाइप अद्याप तयार झालेला नाही. स्टेल्थ AMCA फायटरचा अद्याप कोणताही प्रोटोटाइप नाही. याच परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. 

Advertisement

एअर फोर्स स्वतः सरकारच्या 'मेक इन इंडिया' धोरणाला प्राधान्य देत असतानाच हे विधान आले आहे. आपल्याला भविष्यासाठी तयार होण्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी लागेल. 10 वर्षांत, आपल्याला उद्योगांकडून अधिक उत्पादन मिळेल, परंतु आज आपल्याला जे हवे आहे, ते साहजिकच आजच हवे आहे. आपल्याला आपले काम लवकरात लवकर पूर्ण करावे लागेल. आपल्या सैन्यांना सशक्त करून युद्धे जिंकली जातात, असं त्यांनी सांगितले.

युद्धाचे स्वरूप बदलत आहे

एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह म्हणाले, 'युद्धाचे स्वरूप बदलत आहे. दररोज नवीन तंत्रज्ञान येत आहे. 'ऑपरेशन सिंदूर'ने आपल्याला सांगितले की आपण कोणत्या दिशेने जात आहोत आणि भविष्यात आपल्याला काय हवे आहे. त्यामुळे खूप काम करण्याची गरज आहे, तेव्हाच आपण भविष्यातही आपले उद्दिष्ट साध्य करू शकू.

 एएमसीए - प्रगत मध्यम लढाऊ विमानाला खाजगी उद्योगाच्या सहभागासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे, जे एक खूप मोठे पाऊल आहे आणि हाच विश्वास आज देशाला खासगी उद्योगांवर आहे आणि मला खात्री आहे की यामुळे भविष्यात येणाऱ्या मोठ्या गोष्टींचा मार्ग मोकळा होईल."