राजस्थान: राजस्थानमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या टोंक येथे नदीत बुडून 8 मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. नदीत आंघोळीसाठी गेलेली 11 मुले बुडाली. ज्यापैकी 3 जणांना वाचवण्यात यश आले असून 8 मुलांचा मात्र मृत्यू झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस, बचावपथकासह मृतांच्या कुटुंबियांनी गर्दी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजस्थानमधील टोंक येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे बनास नदीवर बांधलेल्या फ्रेझर ब्रिजजवळ आंघोळ करताना बुडून8 मुलांचा मृत्यू झाला आहे. 11 मुले नदीत आंघोळ करण्यासाठी गेली होती. अपघातानंतर परिसरात घबराट पसरली आहे. जुन्या फ्रेझर ब्रिजजवळील नदीत मुले आंघोळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक खोल पाण्यात गेल्यामुळे सर्व मुले एकामागून एक बुडू लागली.
स्थानिक लोकांच्या मदतीने काही मुलांना रुग्णालयात नेण्यात आले. टोंक सआदत रुग्णालयात जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी जमली आहे. मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सर्व मृत जयपूरचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
(नक्की वाचा - Sonam Raghuvanshi: ज्या 'राज'साठी राजाचा जीव गेला , तोच आला समोर, खतरनाक प्रेम कहाणी)