Passport Row: पासपोर्ट नागरिकत्वाचा अंतिम पुरावा का मानला जात नाही? वाचा काय आहे नियम?

Passport Row: अनेक कडक तपासण्या आणि पोलिसांच्या पडताळणीनंतर मिळणारा पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा कसा असू शकत नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Passport Row: भारतीय पासपोर्ट केवळ प्रवासाचा दस्तऐवज (ट्रॅव्हल डॉक्युमेंट) असून तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानला जाऊ शकत नाही, या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या विधानामुळे देशभरात एकाच वेळी चर्चा आणि वादाला तोंड फुटले आहे. या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अनेक कडक तपासण्या आणि पोलिसांच्या पडताळणीनंतर मिळणारा पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा कसा असू शकत नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा का नाही?

सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट कायदा 1967 अंतर्गत हा दस्तऐवज नियंत्रित केला जातो. या कायद्यानुसार तांत्रिकदृष्ट्या बिगर-नागरिकांनाही काही विशेष परिस्थितीत पासपोर्ट जारी केला जाऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाने 2013 मधील एका निकालात स्पष्ट केले होते की, पासपोर्ट बाळगणे म्हणजे नागरिकत्वाचा अंतिम किंवा निर्णायक पुरावा मानला जाऊ शकत नाही.

Advertisement

दुसरीकडे, भारताचे नागरिकत्व हे संपूर्णपणे एका वेगळ्या आणि जुन्या कायद्याद्वारे म्हणजेच 'नागरिकत्व कायदा 1955' द्वारे ठरवले जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर, एक कायदा दस्तऐवजाचे नियमन करतो, तर दुसरा कायदा व्यक्तीच्या कायदेशीर दर्जाचे नियमन करतो. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत.

( नक्की वाचा : Citizenship Documents: आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्रही नाही... तरीही नागरिकत्व कसे सिद्ध करणार? वाचा सर्व माहिती )
 

राजकीय नेत्यांसह दिग्गजांकडून आश्चर्य व्यक्त

परराष्ट्र मंत्रालयाच्या या भूमिकेवर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तीव्र आक्षेप घेत हे विधान अत्यंत हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. जर सरकारला स्वतःलाच खात्री नसेल की पासपोर्टधारक भारतीय नागरिक आहे, तर सरकार असे पासपोर्ट जारीच का करते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


Topics mentioned in this article