परदेशात जायचं, चांगले पैसे कमवायचे आणि सुखी जिवन जगायचं अशी स्वप्न अनेक तरुण पाहातात. त्यासाठी ते डंकी रुटचा अवलंब करतात. याचाच गैर फायदा एजंट घेतात. त्यातून लाखो रुपयांचा गंडा घातला जाते. शिवाय सांगितलेल्या देशापर्यंत ही अनेक जण पोहोचत नाहीत. असं काहीसं पंजाबच्या होशियारपूर मधल्या 3 तरुणां बरोबर घडलं आहे. या तरुणांना ऑस्ट्रेलियात कामासाठी जायचं होतं. पण ऑस्ट्रेलिया राहीलं बाजूला ते इराणमध्ये पोहोचले. तिथे त्यांच्या बरोबर जे काही झालं ते भयंकर होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंजाबमधील होशियारपूर येथे परदेशात उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या तीन तरुणांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगरूर, नवांशहर आणि होशियारपूर येथील या तरुणांना एका स्थानिक एजंटने ऑस्ट्रेलियात पाठवण्याचे आमिष दाखवले. पण हे तरुण ऑस्ट्रेलियात नाही तर थेट इराणला पोहोचले. तिथे मात्र त्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांचे अपहरण झाले आहे. शिवाय त्यांना सोडण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागीतली जात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आपल्या मुलांना सुरक्षित परत आणण्याची विनंती ही त्यांनी सरकारला केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Home Buying: घर खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा अन् वाचवा लाखो रुपये
होशियारपूरच्या एका एजंटने या तरुणांना परदेशात नोकरी आणि चांगल्या जीवनाचे वचन दिले होते. त्यासाठी त्याने मोठी रक्कम त्यांच्याकडून वसूल केली. त्यांना ऑस्ट्रेलियात कामासाठी पाठवू असंही सांगितलं. पण या तरुणांना इराणमध्ये उतरवण्यात आले. तिथे एजंटनी मात्र त्यांचे अपहरण केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 1 मे पासून हे तरुण ओलीस आहेत. शिवाय तिथल्या स्थानिक एजंटनी त्यांना दोरीने बांधून ठेवले आहे. चाकूच्या धाकावर धमकावून खंडणी मागितली जात आहे. व्हिडिओ कॉलमध्ये कुटुंबीयांनी पाहिले की तरुणांच्या शरीरावर जखमा आणि रक्ताचे डाग होते. अपहरण केलेल्या एजंटनी आधी 1 कोटी, नंतर 55 लाख रुपये पाकिस्तानी खात्यांमध्ये जमा करण्याची मागणी केली होती. असं कुटुंबीय सांगत आहे.
कुटुंबीयांचे म्हणणे आहे की 11 मे नंतर तरुणांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. ते फक्त इराणी एजंटच्या फोनवरून बोलू शकत होते. पीडित कुटुंबांनी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे. परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दुसरीकडे, तरुणांना परदेशात पाठवणारा एजंट फरार असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने लोकांना 'डंकी' मार्गाने परदेशात न जाण्याचा इशारा दिला आहे. परंतु एजंटच्या जाळ्यात अडकून तरुण आपला जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून एजंटच्या शोधात छापे टाकत आहेत. कुटुंबांनी केंद्र आणि राज्य सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून त्यांची मुले सुरक्षित घरी परत येऊ शकतील.