ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्ते वाहून गेले आहेत, तर अनेक भागात भूस्खलन झाल्यामुळे त्या भागांचा राज्याच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सर्वाधिक फटका सिक्कीम आणि आसाम राज्याला पडला आहे. येथे अतिमुसळधार पावसामुळे अनेक वसाहतींमझ्ये पाणी साचलं आहे. सिक्कीमच्या अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Fishing Banned: नौका विसावल्या! यांत्रिक मासेमारीवर 2 महिन्यांची बंदी, मत्स्य विभागाचे आदेश
येत्या काही दिवसात सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयएमडीने राज्यातील पावसाबाबत अलर्टही जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिक्कीममध्ये सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात 1500 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. तर आठ जण बेपत्ता आहे. रेस्क्यू टीमकडून त्यांचा तपास केला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुसळधार पावसामुळे आठ पर्यटकांचा शोध घेण्यात अडचणी जाणवत आहेत. तिस्ती नदीतील पाणी पातळी वाढल्याने अंशत: शोध अभियान स्थगित करण्यात आलं आहे.
अरुणाचल प्रदेश आणि मेघालयात डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे राज्यातील पूर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) सांगितलं की, कामरूप महानगर जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.