Nathuram Godse :गांधीजींच्या हत्येपूर्वी नथुरामच्या मनात नक्की काय होतं? फाशीपूर्वीच्या त्या घोषणांचा अर्थ काय

Mahatma Gandhi Death Anniversary 2026 : . नथुराम गोडसे या तरुणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने अवघा देश हादरला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mahatma Gandhi Death Anniversary 2026 : गोडसे आणि आपटेला फाशी देण्यासाठी नेले जात होते, तेव्हा गोडसेचा आवाज कापत होता.
मुंबई:

Mahatma Gandhi Death Anniversary 2026 : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात म्हणजेच 30 जानेवारी 1948 या दिवशी महात्मा गांधींची हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता 78 वर्ष होत आहेत. नथुराम गोडसे या तरुणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने अवघा देश हादरला होता. बापूंच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या गुन्ह्यासाठी नथुराम गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आप्टे यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा इतिहासातील ती पाने उलटली जात आहेत, ज्यामध्ये गोडसेच्या शेवटच्या क्षणांचे आणि त्याच्या विचारसरणीचे वर्णन आढळते.

फाशीच्या तख्ताकडे जाताना काय घडलं?

जस्टिस जीडी खोसला यांच्या 'द मर्डर ऑफ महात्मा' या पुस्तकानुसार , 15 नोव्हेंबर 1949 च्या सकाळी गोडसे आणि आपटेला फाशी देण्यासाठी नेले जात होते, तेव्हा गोडसेचा आवाज कापत होता. थरथरत्या आवाजात त्याने अखंड भारत अशी घोषणा दिली होती. त्याच्या या अपूर्ण राहिलेल्या घोषणेला नारायण आपटे याने अत्यंत जोरकसपणे 'अमर रहे' असे म्हणत पूर्ण केले होते. भारताच्या इतिहासातील ही एक अशी घटना होती ज्याने एका मोठ्या पर्वाचा शेवट केला होता.

गांधीजींची हत्या आणि गोडसेची विचारसरणी

नथुराम गोडसेच्या मनात गांधीजींबद्दल असलेला राग हा प्रामुख्याने देशाच्या फाळणीशी जोडलेला होता. फाळणीच्या वेळी झालेला हिंसाचार आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती याला गांधीजी जबाबदार असल्याचे गोडसेला वाटत होते. इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या अभ्यासानुसार, गांधीजींचे अहिंसेचे तत्व आणि मुस्लिमांच्या हितासाठी त्यांनी घेतलेली भूमिका हिंदू समाजासाठी घातक आहे, असा विचार गोडसेच्या मनात पक्का झाला होता. विशेषतः पाकिस्तानला त्यांचे आर्थिक अधिकार मिळवून देण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांनी गोडसे अधिक चिडला होता आणि त्यातूनच त्याने हा हिंसक मार्ग निवडला.

( नक्की वाचा : Mahatma Gandhi Death Anniversary :गांधीजींच्या पुण्यतिथीला शाळेत करा 'हे' भाषण, शिक्षकांसह सर्व होतील प्रभावित )

गुप्त अंत्यसंस्काराची प्रक्रिया

गोडसे आणि आपटे यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले नाहीत. तत्कालीन सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हा अत्यंत कडक निर्णय घेतला होता. 

Advertisement

15 नोव्हेंबर 1949 रोजी सकाळी फाशीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अंबाला जेलच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. जेलच्या आतूनच अत्यंत गुप्तपणे त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि जवळच असलेल्या घग्गर नदीच्या काठी नेऊन त्यांचे दहन करण्यात आले.

मृतदेह न सोपवण्यामागची महत्त्वाची कारणे

त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, सरकारने मृतदेह कुटुंबाकडे न सोपवण्यामागे एक निश्चित धोरण आखले होते. गोडसे आणि आप्टे यांच्या समर्थकांकडून त्यांचे उदात्तीकरण होऊ नये, अशी भीती सरकारला वाटत होती. त्यांचे अवशेष किंवा समाधी हे भविष्यात एखाद्या विचारसरणीच्या प्रचाराचे साधन बनू नयेत आणि देशातील सामाजिक सलोखा टिकून राहावा, या उद्देशाने सरकारने ही टोकाची भूमिका घेतली होती. आजही या विषयावर समाजात दोन टोकाची मते पाहायला मिळतात, मात्र 30 जानेवारी हा दिवस देशासाठी नेहमीच गांधीजींच्या बलिदानाच्या आठवणीने भारलेला असतो.

Advertisement