Shocking news: साखरपुडा झाला, मंडप सजला, पण एका झटक्यात तरुणींच्या स्वप्नांचा चुराडा झाला

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील शिखा बेलसरे या तरुणीचा 21 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

मंगेश जोशी 

लग्नाची पत्रिका देवा चरणी अर्पण करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण वधूवर काळाने झडप घातली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे गावाजवळ कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात नवरीसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. काही दिवसांवर या तरुणीचे लग्न होणार होते. तिचा साखरपुडा ही झाला होता. ती आपल्या संसाराची स्वप्न पाहात होती त्याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली. 

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील शिखा बेलसरे या तरुणीचा 21 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. 8 मे रोजी तिचा विवाह संपन्न होणार होता. घरात सर्व तयारी झाली होती. मंडप ही घातला होता. लग्नाची पहिली पत्रिका अर्पण करण्यासाठी बेलसरे कुटुंब नाशिकच्या सप्तशृंगी गडावर गेले होते. देवदर्शन आटोपून परतत असताना पाचोरा-भडगाव रस्त्यावरील बांबरुड गावाजवळ त्यांच्या कारचे टायर अचानक फुटले. नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला.

Advertisement

नक्की वाचा - Shivsena UBT: विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर, 'या' नावामुळे पेच निर्माण होणार?

या अपघातात वधू शिखा बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर यांचा दुर्दैवी अंत झाला. तसेच शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाचा मांडव सजलेला असतानाच या दोन मृत्यूंनी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिखा लग्न होणार म्हणून खुश होती. पण तिच्या मृत्यून लग्न घरात आता शोक व्यक्त केला जात आहे. ज्या घरातून तिची पाठवणी होणार होती त्या ऐवजी आता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. 

नक्की वाचा - Cabinet decision:'साता समुद्रापार महापुरूषांच्या विचारांचा जागर' राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

या अपघाताने शिखाच्या घरचे हादरून गेले आहेत. तर तिच्या होणाऱ्या सासरच्या लोकांनी मोठा धक्का बसला आहे.  "शिकाचा 8 मे रोजी विवाह होता, घरात लग्नाची धावपळ सुरू होती. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. जळगावच्या पाचोरा तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघाताने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावून घेतला आहे. टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात नवरी मुलगी आणि तिच्या वहिनीचा मृत्यू झाला असून लग्नाच्या घरात आता अंत्यविधीची तयारी करण्याची वेळ आली आहे.