Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा; तुमच्या स्टेशनवर सुरु होणार खास सोय, पहा संपूर्ण यादी

Maharashtra Railway Stations Modernization: मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Maharashtra Railway Stations Modernization: राज्यातील 8 रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे.
मुंबई:

Maharashtra Railway Stations Modernization: मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. देशभरातील 76 प्रमुख रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी 'प्रवासी होल्डिंग क्षेत्रे' (Permanent Passenger Holding Areas) उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 8 अत्यंत महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. 

विशेषतः मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), दादर, मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनस या प्रमुख स्थानकांवर ही आधुनिक केंद्रे उभारली जाणार आहेत. यामुळे सणासुदीच्या किंवा गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि शिस्तबद्ध प्रतीक्षा क्षेत्र उपलब्ध होणार आहे.

काय आहे निर्णय?

रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा लक्षात घेऊन, केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील 76 प्रमुख रेल्वे स्थानकांवर आधुनिक प्रवासी होल्डिंग क्षेत्रे (Passenger Holding Areas) उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाचा हा निर्णय देशातील रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन (Crowd Management) अधिक कार्यक्षम आणि मानवी गरजा पूर्ण करणारे बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या सर्व ठिकाणी प्रवाशांसाठी बसण्याची, तिकीट विक्रीची आणि आरामदायक प्रतीक्षेची अत्याधुनिक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होईल.

Advertisement

( नक्की वाचा : Rohit Arya: मुंबईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याची नाराजी काय होती? अखेर 'ते' रहस्य उघड, पाहा Video )
 

महाराष्ट्रातील 8 स्टेशनचा समावेश

या राष्ट्रीय योजनेत महाराष्ट्रातील आठ प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या या स्थानकांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील ज्या स्थानकांवर कायमस्वरूपी 'प्रवासी होल्डिंग क्षेत्रे' विकसित केली जाणार आहेत, त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)
दादर
पुणे
नाशिक रोड
नागपूर
मुंबई सेंट्रल
बांद्रा टर्मिनस

कधीपर्यंत पूर्ण होणार काम?

रेल्वे मंत्री वैष्णव यांनी या होल्डिंग क्षेत्रांची बांधणी 2026 च्या सणासुदीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि सणासुदीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जाणार आहे. ही सर्व केंद्रे स्थानिक हवामान, प्रवासी गरजा आणि परिसराच्या परिस्थितीनुसार 'मॉड्युलर डिझाईन'मध्ये उभारली जाणार आहेत, जेणेकरून ते प्रवाशांसाठी सर्वात उपयुक्त ठरतील.

Advertisement

नवी दिल्ली दुर्घटनेनंतर महत्त्वाचे पाऊल

रेल्वे मंत्रालयाने हे महत्त्वाचे पाऊल फेब्रुवारी यावर्षी  नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (NDLS) झालेल्या चेंगराचेंगरीच्या (Stampede) दुर्घटनेनंतर उचलले आहे. महाकुंभासाठी प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि गाड्यांच्या विलंबाने निर्माण झालेल्या गोंधळात ही दुर्घटना घडली होती, ज्यामुळे अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते.

या दुर्घटनेनंतर, गर्दीचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानक येथे एक 'पायलट प्रोजेक्ट' म्हणून कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (Permanent Holding Area) उभारण्यात आला. या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर, देशभरात अशा सुविधांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी दिल्ली येथील होल्डिंग एरिया केवळ चार महिन्यांत पूर्ण करण्यात आला आणि मोठ्या गर्दीला सामावून घेण्यात तो प्रभावी ठरला आहे. याच यशस्वी मॉडेलच्या आधारावर आता महाराष्ट्रासह देशातील अन्य 75 रेल्वे स्थानकांवर ही सोय उपलब्ध होणार आहे.

Advertisement

प्रवाशांना काय फायदा होईल?

सुरक्षितता: स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर होणारी अनावश्यक गर्दी कमी होईल, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटनांचा धोका टळेल.

शिस्तबद्धता: प्रवाशांना त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार होल्डिंग एरियातून थेट प्लॅटफॉर्मवर सोडले जाईल, ज्यामुळे गर्दीचे नियोजन सोपे होईल.

सुविधा: वातानुकूलित किंवा आरामदायक बसण्याची जागा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि तिकीटिंगची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

आधुनिकता: महाराष्ट्रातील प्रमुख स्थानके आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांनी युक्त होतील.

महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल, CSMT आणि LTT सारख्या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांवर या सुविधेमुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीचा आणि सुरक्षित होणार आहे.