Mumbai Police News: ड्रग्ज माफियांना 'सुट्टी' नाही! देवेन भारतींचा थेट इशारा; मुंबईकरांनाही केलं मोठं आवाहन

Mumbai Police Drugs Crackdown News: केवळ सप्लायरच नव्हे, तर पेडलर आणि सेवन करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Police News:  मुंबईतील अंमली पदार्थांचे वाढते जाळे आणि तरुणाईला पडलेला नशिल्या विळख्याबाबत मुंबई पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात ड्रग्ज विरोधात 'झिरो टॉलरन्स'चे धोरण राबवणार असून, यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिला आहे. केवळ सप्लायरच नव्हे, तर पेडलर आणि सेवन करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange: "वेळ गेलेली नाही,...", लग्नाळू तरुणांची लग्न होणार; मनोज जरांगेंचा मोलाचा सल्ला ऐका!

'ड्रग्स माफियांची आता खैर नाही'

गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी शहराच्या विविध भागांमध्ये वारंवार छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवायांच्या परिणामी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून अनेक जणांना अटकही करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपास कार्यरत असलेल्या नेटवर्कवर पोलिसांचे लक्ष आता विशेष केंद्रित झाले आहे, कारण तपासात असे दिसून आले आहे की तरुणांना सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे.

Advertisement

सहज मिळणाऱ्या पैशाच्या आणि वाईट संगतीच्या लालसेमुळे अनेक तरुण या जाळ्यात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी मुळापासून उखडून टाकण्यासाठी पोलीस आता एका रणनीतीवर काम करत आहेत, जेणेकरून भविष्यात हा धोका नियंत्रणात ठेवता येईल. मुंबई पोलिसांनी जनतेचे सहकार्यही मागितले आहे. अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास लोकांनी तात्काळ कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.  केवळ जनतेच्या पाठिंब्यानेच ही लढाई जलद आणि प्रभावी करता येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

मुंबईकरांनाही आवाहन

​गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांनी विविध उपनगरांत धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सक्रिय असलेल्या टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. तपासादरम्यान असे समोर आले आहे की, अमली पदार्थ तस्कर जाणीवपूर्वक तरुण पिढीला लक्ष्य करत आहेत. झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी अनेक तरुण या गुन्हेगारी विश्वाकडे ओढले जात आहेत.

ही साखळी मुळासकट उखडून टाकण्यासाठी आता गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ कारवाई करून न थांबता, अंमली पदार्थांची पुरवठा साखळी (Supply Chain) तोडण्यावर पोलिसांचा भर आहे. या मोहिमेत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असून, संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)