Emerging Business Conclave Pune: 'सरकार वारंवार असं म्हणत आहे की आम्ही हिंदीची सक्ती करत नाही. हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. तुम्हालाही इंग्रजी चालतं पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही,' असं म्हणत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. एनडीटीव्ही मराठीच्या बिझनेस कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते.
Pune : पुण्याहून लवकरच युरोपात विमानानं जाता येणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
"नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मोदीजींनी आग्रह धरला की शिक्षण हे मातृभाषेतून मिळायला पाहिजे. जसजसे आपण शिक्षण मातृभाषेत आणू यातून त्याला विषयाचा ग्राम मिळेल. आपल्याला आपली मुले महाराष्ट्रातच राहावी असं वाटत असेल नो प्रोब्लेम.. मराठी पुरेल. जर देशामध्ये 55 टक्के लोकसंख्या हिंदी भाषिक आहे आणि ज्या मुंबईत राहतो त्यात दीड कोटी लोक अमराठी आहेत. त्यांच्याशी बोलताना हिंदी हवी की नको? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच "पहिलीपासून इंग्रजीही सक्तीची नको, कारण ती विद्यार्थ्यांना झेपत नाही. झेपण्याचा विषय असेल तर ओके? सरकार वारंवार असं म्हणत आहे की आम्ही हिंदीची सक्ती करत नाही. हिंदीला विरोध करत असाल तर इंग्रजीलाही विरोध करा. तुम्हालाही इंग्रजी चालतं पण हिंदी चालत नाही हे मला काही कळत नाही. माझ्याकडे सगळ्यांचा रेकॉर्ड माहित आहे. मी उद्या यादी जाहीर करणार आहे. कोणाकोणाची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकली, उद्याच यादी देतो," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
"राजसाहेब आणि उद्धवजी या दोघांची माझी असलेली मैत्री कायम आहे त्यांच्याबद्दल मी ते झोपेचे सोंग आणतात असं मी म्हणणार नाही. त्यामानाने शरद पवारांची भूमिका बॅलन्स आहे. त्यांनी म्हटलं आहे की पहिलीपासून नको पाचवीपासून शिकवा. आपण जर्मन, फ्रेंच शिकवायला तयार आहोत मग एवढा हिंदीचा विरोध कुठून आला? दादांना राज ठाकरेंकडे पाठवले त्यांना त्रिभाषा धोरण काय आहे हे समजावून सांगितलं. हा त्रिभाषा फॉर्म्युला उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला आहे. हा ते वाचत नसतील. तुम्हाला सरकार जास्त दिवस चालवायला मिळालं नाही त्यामुळे तो रिपोर्ट आम्ही अंमलात आणलो आहोत," असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.