प्रांजल कुलकर्णी, कसारा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, मारामाऱ्या तसेच अपघातांच्या भयंकर घटना समोर येत आहेत. शहापूर तालुक्यातील कसारा घाटामध्ये अशीच एक हादरवुन टाकणारी घटना उघडकीस आली आहे. घाटामध्ये एका झुडपात पडलेल्या गाडीत 3 तरुणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणांचा अपघात की घातपात? याबाबतचा तपास आता सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील कसारा घाटामध्ये एका बंद कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत तीन तरुणांचे मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई नाशिक महामार्गावर रोडच्या कडेला झाडाझुडपात एका नाल्याजवळ ही कार कोसळली होती. गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचावपथकाने धाव घेतली. तिनही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अपघातग्रस्त गाडीही क्रेनच्या साहाय्याने झुडपातून बाहेर आणण्यात आली आहे. हे तीनही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचरोबर तिघे जगण मुंबईमधील विविध परिसरातील रहिवासी असल्याचेही समोर आले आहे.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
दरम्यान, या मुलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने किमान तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. या मुलांचे कुटुंबीय किंवा पोलिसांना त्यांचा शोध कसा लागला नाही ? कार कशी कोसळली ? हा अपघात नक्की कसा झाला ? हा नेमका अपघात आहे की घातपात असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कसारा पोलीसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.