जाहिरात

MI vs SRH : मुंबई इंडियन्सचा पराभव का झाला? हार्दिक पांड्यानं सांगितलं कारण

मुंबई इंडियन्सचा या आयपीएल सिझनमध्ये सलग दुसरा पराभव झालाय. सनरायझर्स हैदराबादनं मुंबईवर 31 रन्सनं विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं या मॅचमध्ये पराभव का झाला? याचं कारण सांगितलं आहे. (फोटो सौजन्य : BCCI/IPL)

  • मुंबई इंडियन्सचा या आयपीएल सिझनमध्ये सलग दुसरा पराभव झालाय. सनरायझर्स हैदराबादनं मुंबईवर 31 रन्सनं विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं या मॅचमध्ये पराभव का झाला? याचं कारण सांगितलं आहे. (फोटो सौजन्य : X)
  • सनरायझर्स हैदराबादनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 आऊट 277 रन्स केले. हा आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) 11 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. आरसीबीनं पुणे वॉरियर्स विरुद्ध 5 आऊट 263 रन्स केले होते. (फोटो सौजन्य : @mufaddal_vohra )
  • मुंबई इंडियन्सनं या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण, त्यांना 5 आऊट 246 रन्सपर्यंतच मजल मारता आली. या मॅचमध्ये एकूण 523 रन्स बनले हा देखील आयपीएल रेकॉर्ड आहे. (फोटो - X)
  • 'SRH 277 रन करेल असं टॉसवेळी वाटलं नव्हतं. प्रतिस्पर्धी टीमनं 277 रन केले याचा अर्थ त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे,' असं महत्त्वाचं कारण या पराभवानंतर हार्दिकनं सांगितलं. (फोटो सौजन्य : X)