T-20 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पाहा 30 PHOTOS
T20 World Cup: टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. भारताने सामना जिंकल्यानंतर 'इंडिया, इंडिया' आणि 'मेन इन ब्लू'चे नारे घुमत होते. टीम इंडियानेही जल्लोष करत विजयाचा आनंद मैदानावरच साजरा केला.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं, 'T20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन. कधी हार न मानण्याच्या वृत्तीसह टीमनं अगदी कठीण परिस्थितीचा सामना केला. संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्याचं प्रदर्शनं केले. फायनल मॅचमधील विजय देखील असाधारण आहे. शाबास टीम इंडिया. तुमचा आम्हाला अभिमान आहे.'