Delhi Protest:'आधी राजीनामा, नंतरच चर्चा', विरोधकांचा हंगामा, लोकसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ही ठप्प

काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी ही राज्यसभेत आधी राजीनामा नंतर चर्चा अशी भूमीका घेतली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • लोकसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवस ठप्प केले आहे
  • काँग्रेस आणि विरोधकांनी आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मग चर्चा अशी भूमीका घेतली
  • लोकसभेत विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे अनेक वेळा कामकाज तहकूब करण्यात आले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेचं कामकाज विरोधकांनी सलग तिसऱ्या दिवशी ठप्प पाडलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारने चर्चेची तयारी दाखवली होती. काँग्रेस आणि विरोधकांनी ही चर्चेची तयारी दर्शवली. पण  आधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामा नंतरच चर्चा अशी ठाम भूमीका घेतली. त्यामुळे सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला. यात लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे तिन वेळा लोकसभेचे कामकाज तबकूब करण्यात आले. शेवटी हा गदारोळ कमी झालाच नाही म्हणून दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. 

लोकसभे सोबत राज्यसभेतही विरोधकांच्या आक्रमक भूमीकेला सरकारला सामोरे जावे लागले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेस आणि विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरत जोरदार घोषणाबाजी केली. यावर संसंदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार निट पेपर फुटी प्रकरणी चर्चेसाठी तयार आहे. जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळी आम्ही चर्चा करू. त्याला उत्तर ही देण्याची सरकारची तयारी आहे. असं त्यांनी सांगितलं. मात्र काँग्रेस खासदार के.सी. वेणूगोपाल यांनी आम्ही ही चर्चेला तयार आहे. पण त्या आधी धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा. आधी राजीनामा नंतरच चर्चा अशी ठाम भूमीका काँग्रेसने घेतले. त्यानंतर घोषणाबाजी वाढतच गेली. 

Advertisement

नक्की वाचा - "आमचा वेळ वाया घालवू नका, VIDEO पाहणार नाही"'; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी SCचा तातडीने सुनावणीस नकार

त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केले. पुन्हा ज्यावेळी कामकाज सुरू झाले त्यावेळी ही विरोधक आक्रमक होते. यावेळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव सरकारला धारेवर धरले. हा मुद्दा काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि भाजपचा नाही. तर हा मुद्या युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे. आम्हाला बोलू का दिलं जात नाही. तुम्ही योग्य भूमीका घेत नाही असा थेट आरोप त्यांनी अध्यक्षांवर केला. आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत. विद्यार्थी रस्त्यावर उतरणारच. त्यांच्यासोबत जे झालं ते भयंकर होतं. कोणाचे हात तोडले. कोणाचे पाय तोडले. मुलींचे कपडे फाडले. तुम्ही आई बहीणींचे कपडे फाडणार आहात का? तुम्हाला याची परवानगी कुणी दिली? अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले. 

नक्की वाचा - दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! शरद पवार,सुप्रिया सुळे PM मोदींच्या भेटीला; भेटीचं कारण आलं समोर

आमचा नाईलाज झाला म्हणून आम्ही पंतप्रधानांच्या निसासस्थानाबाहेर गेलो. लोकसभेत तुम्ही आमचं ऐकलं नाही. पंतप्रधान बाहेर बोलतात. मग त्यांना लोकसभेत बोलायला काय झालं? ते का बोलले नाहीत. असा प्रश्न ही त्यांनी सरकारला केला. यामुळे पुन्हा एकदा लोकसभेत गदारोळ झाला. शेवटी अध्यक्षांनी दोन वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब केले. मात्र दोन वाजताही तिच स्थिती होती. विरोधकांनी राजीनाम्याचा प्रश्न लावून धरला होता. यामुळे गदारोळ वाढतच गेला. शेवटी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभे प्रमाणेच राज्यसभेत ही जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी ही राज्यसभेत आधी राजीनामा नंतर चर्चा अशी भूमीका घेतली होती.