मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली, 'या' पक्षाने केला बहुमताचा दावा

मणिपूरच्या जनतेला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील कार्यकाळात कोविडमुळे दोन वर्षे वाया गेली असं ही राज्यपालांना सांगण्यात आलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Manipur New Govt: मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापनेची कसरत अचानक पुन्हा सुरू झाली आहे. भाजप आमदार थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली.  44 आमदार नवीन सरकार स्थापनेसाठी तयार आहेत. त्यांचा आपल्याला पाठींबा आहे असं ही त्यांनी सांगितलं. भाजप आमदारांनी इतर नऊ आमदारांसह राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. ते म्हणाले,'44 आमदार जनतेच्या इच्छेनुसार सरकार स्थापनेसाठी तयार आहेत.असं त्यांनी राज्यपालांना सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 राज्यपालांनी आमचे बाजू समजून घेतली. त्यामुळे ते लवकरच मणिपूरच्या हिताचा निर्णय घेतील असं ही यावेळी आमदार  थोकचोम यांनी सांगितलं.  सरकार स्थापनेचा दावा करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर याबाबतचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल असं सांगत, त्यांनी निर्णयाचा चेंडू केंद्रीय नेतृत्वाच्या कोर्टात टोलवला आहे. पुढे ते असे ही म्हणाले की आम्ही तयार आहोत हे राज्यपालांना सांगणे म्हणजे सरकार स्थापनेचा दावा सादर करण्यासारखेच आहे. विधानसभा अध्यक्ष सत्यव्रत यांनी 44 आमदारांची वैयक्तिक आणि संयुक्तपणे भेट घेतली आहे. कोणीही नवीन सरकार स्थापनेस विरोध केलेला नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं. 

ट्रेंडिंग बातमी - Home Buying: घर खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा अन् वाचवा लाखो रुपये

मणिपूरच्या जनतेला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील कार्यकाळात कोविडमुळे दोन वर्षे वाया गेली.  या कार्यकाळात संघर्षामुळे आणखी दोन वर्षे वाया गेली आहेत. असं ही ते म्हणाले. भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. मे 2023 मध्ये मणिपूरच्या मेईतेई आणि कुकी समुदायात जातीय संघर्ष पेटला होता. हा संघर्ष बिरेन सिंह यांना व्यवस्थित हाताळता आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर  बिरेन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ऑस्ट्रेलियात पाठवतो सांगून इराणला उतरवले, 'त्या' 3 तरुणांबरोबर तिथेच भयंकर घडले

मणिपूरच्या विधानसभेत  60 सदस्य आहेत. सध्या विधानसभेत 59 आमदार आहेत. एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये एकूण 44 आमदार आहेत. त्यात 32 मेईतेई, तीन मणिपुरी मुस्लिम आणि नऊ नागा आमदार आहेत. तर काँग्रेसचे पाच आमदार आहेत. हे सर्व जण मेईतेई समाजाचे आहेत. उर्वरित 10 आमदार कुकी समूदायाचे आहेत. त्यापैकी सात जणांनी मागील निवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली होती. दोन कुकी पीपल्स अलायन्सचे आमदार आहेत.शिवाय एक अपक्ष आमदार आहे.

Advertisement