राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Sharmishta Panoli: पुण्यात कायद्याचं शिक्षण घेणारी शर्मिष्ठा पानोली या 22 वर्षांच्या तरुणीच्या अटकेमुळे देशात एक नवा वाद सुरू झाला आहे. तिला कोलकाता पोलिसांनी कोणतंही वॉरंट न बजावता अटक केली आहे. या अटकेनंतर शनिवारी शर्मिष्ठा पानोली सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडिंग होती. या प्रकरणात तिच्या बाजूने आणि विरोधात अनेकांनी पोस्ट केले आहे. शर्मिष्ठाला कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाला हरियाणातील गुरुग्राममधून अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहेत आरोप?
शर्मिष्ठा पानोलीवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. तिने अलीकडेच सोशल मीडियावर काही व्हिडिओ टाकले होते. या व्हिडिओंमध्ये तिची भाषा आक्षेपार्ह होती. त्याचबरोबर, ती पहलगामवरील हल्ला आणि त्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर शांत बसलेल्या अनेक दिग्गज व्यक्तींना लक्ष्य केलं होतं. शर्मिष्ठावर तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून एका समुृदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे.
शर्मिष्ठाने एका वादग्रस्त व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादानंतर तो व्हिडिओ डिलीट करून सार्वजनिक माफी मागितली होती. तरीही, कोलकाता पोलिसांनी कोणतीही कायदेशीर नोटीस न देता त्यांच्या घरी जाऊन अटक केली. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे.
( नक्की वाचा : अहिल्यादेवींनी सोमनाथाचं मंदिर बाजूला का उभारलं? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला तो इतिहास )
या प्रकरणात दिल्लीतील मजिस्ट्रेटने मध्यरात्री ट्रान्झिट रिमांडला मंजुरी दिली, आणि शर्मिष्ठाला सकाळी कोलकाताला नेण्यात येणार आहे. या कारवाईला अनेकांनी 'शॉकिंग आणि लज्जास्पद' असे संबोधले आहे. काहींनी तर शर्मिष्ठा यांच्याशी दहशतवाद्यांसारखी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे.
वारीस पठाण यांच्यावर गंभीर आरोप
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (AIMIM) चे नेते वारीस पठाण (Waris Pathan) यांना या अटकेचा मुख्य सूत्रधार मानले जात आहे. काही एक्स पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, पठाण यांनी शर्मिष्ठा यांच्या व्हिडिओवर आक्षेप घेत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. यामुळे त्यांच्यावर या “बेकायदेशीर अटके”साठी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
शर्मिष्ठावर कोलकाताच्या आनंदपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध FIR दाखल झाली. सोशल मीडियावर #ArrestSharmishta मोहीम सुरू झाली, आणि काहींनी कोलकाता पोलिसांना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग करत अटकेची मागणी केली.
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह
कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा यांना कोणतीही कायदेशीर नोटीस न देता अटक केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काहींच्या मते, ही कारवाई पश्चिम बंगाल सरकारच्या दबावाखाली झाली आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवरही टीका होत आहे.
शर्मिष्ठाला आता कोलकाताला नेले आहे, तिथं पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.