Rahul Gandhi: 'हे महिला आरक्षण बिल नव्हे, तर..' राहुल गांधी लोकसभेत हे काय बोलले, एकच गोंधळ

"आसाम आणि काश्मीरमध्ये जे केले, तेच आता पूर्ण देशात करण्याचा तुमचा विचार आहे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला निवडणूक नकाशा बदलण्याचा राजकीय कट असल्याचा आरोप केला
  • त्यांनी सरकारवर ओबीसी आणि दलित समाजाची सत्ता हिरावण्याचा प्रयत्न करण्याचा खळबळजनक आरोप केला
  • राहुल गांधी म्हणाले की विधेयक मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप का रखडली आहे, असा सवाल उपस्थित केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

Nari Shakti Vandan: "हे महिला आरक्षण बिल नसून, भारताचा निवडणूक नकाशा बदलण्याचा एक राजकीय कट आहे," अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. 2023 मध्येच हे विधेयक मंजूर झाले असताना त्याची अंमलबजावणी अद्याप का रखडली आहे, असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी यावेळी सरकारला धारेवर धरत भाजपची कोंडी केली. त्यामुळे काही वेळ लोकसभेत तणाव आणि गोंधळ निर्माण झाला होता. 

आपल्या भाषणात राहुल गांधींनी महिलांच्या शक्तीचा गौरव केला. "महिला या देशाची मध्यवर्ती शक्ती आहेत. आई आणि बहीण म्हणून त्या आपल्या जीवनाचा आधार आहेत," असे ते म्हणाले. आपली बहीण प्रियंका गांधी यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, "काल प्रियंकाने आपल्या भाषणातून जे 5 मिनिटांत साध्य केले, ते मी 20 वर्षांत करू शकलो नाही. त्यांच्या भाषणामुळे अमित शाह यांच्या चेहऱ्यावरही हसू आले, हे मी शिकायला हवे." असं ही यावेळी राहुल गांधी म्हणाले. 

Advertisement

नक्की वाचा - Nari Shakti Vandan: 'ही मोदींची गॅरंटी!' महिला आरक्षणावरून पंतप्रधानांनी विरोधकांना ठणकावले, दिली मोठी ग्वाही

राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, हे विधेयक म्हणजे जाती जनगणनेच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे. "तुम्ही ओबीसी आणि दलितांना हिंदू म्हणता, पण उद्योग, न्यायपालिका आणि खाजगी क्षेत्रात त्यांना स्थान कुठे आहे? हे विधेयक म्हणजे राज्यघटनेपेक्षा मनुवादाला महत्त्व देण्याचा प्रकार आहे," असा आरोप त्यांनी केला. आसाम आणि जम्मू-काश्मीरप्रमाणे आता सत्ता राखण्यासाठी संविधानात बदल करून देशाचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

"महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली सरकार देशातील ओबीसी आणि दलित समाजाची सत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे," असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. या विधेयकाच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबावरून त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. राहुल गांधी म्हणाले की, भारतीय समाजात स्त्रियांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. "माझ्या आईने आणि बहिणीने मला खूप काही शिकवले आहे. माझी बहीण प्रियंकाने काल संसदेत जे भाषण केले, त्याने वातावरण हलके केले," असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चिमटा काढला. मात्र, त्याच वेळी त्यांनी गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले. "देशातील ओबीसी आणि दलित भगिनींना प्रतिनिधित्व देण्याऐवजी त्यांच्याकडून हक्क काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे," असे ते म्हणाले.

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसच्या इतिहासाची आठवण करून दिली. "राजीव गांधींनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता. काँग्रेस आणि इतर सरकारांना संधी मिळूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते," असे रिजिजू यांनी प्रत्युत्तरात सांगितले. यावरून सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला आरक्षण विधेयक हे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणले असून, त्यातून देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा घाट घातला जात आहे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. लोकसभेतील चर्चेत सहभागी होताना त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरले. राहुल गांधींनी स्पष्ट केले की, देशाच्या लोकशाही रचनेत ढवळाढवळ करणे हे देशविरोधी आहे आणि काँग्रेस तसे होऊ देणार नाही. "आसाम आणि काश्मीरमध्ये जे केले, तेच आता पूर्ण देशात करण्याचा तुमचा विचार आहे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही," असा इशारा त्यांनी दिला. या चर्चेने संसदेतील वातावरण चांगलेच तापले होते.