ऑपरेशन लग्नकार्य! हुंडा घेणारा कळवा 5000 मिळवा, 'या' राजकीय पक्षाचा भन्नाट उपक्रम

हुंड घेणारा कळवा आणि पाच हजार रुपये मिळवा अशी योजनाच जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

प्रथमेश गडकरी

Dowry News: वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर सर्वत्र संतापाची लाट आहे. हुंड्या विरोधात आता लोक उघड पणे बोलू लागलेत. हुंडा घेवू नये यासाठी ठराव ही करण्यात आले आहेत. अनेक वर्षापासून बंदी असूनही, सुरू असलेली ही हुंड्याची प्रथा मुळापासून उखडली पाहीजे. त्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहे. त्या पैकीच एका राजकीय पक्षाच्या नेत्याने एक भन्नाट उपक्रम राबवला आहे. त्यात त्याने हुंड घेणारा कळवा आणि पाच हजार रुपये मिळवा अशी योजनाच जाहीर केली आहे. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी मुंबईच्या सानपाडा भागात सध्या एक बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ऐन वेळी कुठेही बॅनर पोस्टर दिसले की लोक तोंड मुरडतात. किंवा अशा गोष्टी त्यांना आवडत नाहीत. पण या बॅनरचे कौतूक होताना दिसत आहे. हे बॅनर आहे हुंडा घेणाऱ्या लोकां विरोधात. या बॅनरवर "हुंडा घेणारा कळवा – 5000 रुपये मिळवा" असं लिहीलं आहे. शिवाय ऑपरेशन लग्नकार्य असं त्यावर ही लिहीलं आहे. माणूसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू असंही म्हटलं आहे. प्रत्येक व्यक्ती हे बॅनर पाहूनच पुढे जात आहे असे चित्र सध्या सानपाड्यात पाहायला मिळत आहे.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ऑस्ट्रेलियात पाठवतो सांगून इराणला उतरवले, 'त्या' 3 तरुणांबरोबर तिथेच भयंकर घडले

हे बॅनर सानपाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्यावतीने लावण्यात आले आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा साधना इंदोरे आणि विभागप्रमुख बाबाजी इंदोरे यांच्या पुढाकाराने या बॅनरद्वारे "ऑपरेशन लग्नकार्य" सुरू करण्यात आलं आहे. हुंडा प्रथा नष्ट करण्यासाठी समाजातील नागरिकांकडून त्यांनी सहकार्य मागितले आहे. शिवाय अशी घटना कुठे आढळली तर आम्हाला कळवा आमच्या पद्धतीने त्याचा कार्यक्रम करू असे इंदोरे यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं

या बॅनरवर त्यांनी एक मोबाईल क्रमांकही दिला आहे. ज्याला कुणाला हुंड्याबाबत माहिती द्यायची आहे त्याने या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. जो व्यक्ती माहिती देईल त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असं ही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता त्याला किती प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र या उपक्रमाचे कौतूक सर्वत्र होत आहे. हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे.

Advertisement