राहुल गांधी कुणाच्या वतीनं बोलत आहेत? पाकिस्तानचं नाव घेत श्रीकांत शिंदे यांचा जोरदार हल्ला

श्रीकांत शिंदे हे ऑपरेशन सिंदूरनंतर चार देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाचे प्रमुख होते. त्यांच्या शिष्टमंडळाने यूएई, लायबेरिया, कांगो आणि सिएरा लिओन या देशांचा दौरा केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरुद्ध घेतलेल्या कठोर निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत 100 पेक्षा जास्त  अ दहशतवादी मारले गेले. या ऑपरेशननंतर भारताने 'मिशन पाक बेनकाब' (Mission Pak Benaqab) अंतर्गत सर्वपक्षीय खासदारांना परदेश दौऱ्यावर पाठवले. परदेशात गेलेल्या या खासदारांनी भारताच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या (Zero Tolerance) धोरणाबद्दल माहिती दिली, ज्याला जगातील इतर देशांनीही पाठिंबा दिला आहे.

UAE, लायबेरिया, कांगो आणि सिएरा लिओनच्या दौऱ्यावर गेलेले खासदारांचे शिष्टमंडळ आता परतला आहे. या चमूत सहभागी असलेले शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्याशी NDTV ने विशेष बातचीत केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

श्रीकांत शिंदे हे ऑपरेशन सिंदूरनंतर चार देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाचे प्रमुख होते. त्यांच्या शिष्टमंडळाने यूएई, लायबेरिया, कांगो आणि सिएरा लिओन या देशांचा दौरा केला. या दौऱ्यावर परतल्यानंतर NDTV शी केलेल्या चर्चेदरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधींनी अलीकडच्या काळात केलेल्या वक्तव्याचा शिंदे यांनी समाचार घेतला. 

राहुल गांधींवर श्रीकांत शिंदे यांची टीका

राहुल गांधींवर टीका करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, 'अशा वेळी सर्वांनी एका सुरात बोलले पाहिजे. केवळ राजकारण करण्यासाठी बोलत आहेत. ज्यांची राजकीय परिपक्वता (Political maturity) नाही, ते असे बोलत आहेत. त्यांच्याच पक्षाचे लोक शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. यांच्या विधानाचा पाकिस्तान संदर्भ घेत आहे. हे कोणाच्या वतीने बोलत आहेत?'

Advertisement

( नक्की वाचा : भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट! )
 

शिवसेना नेते पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानमध्ये  दहशतवादाला आश्रय मिळतो आणि प्रोत्साहन दिले जाते, हे आम्ही या देशांना सांगितले. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचा हा संदेश आम्हाला द्यायचा होता.  पाकिस्तान हा दहशतवाद फक्त भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही पसरवत आहे.'