IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans : खराव सुरुवातीनंतर दमदार कमबॅक करत मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2025 च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्सला शुक्रवारी (30 मे) एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात उतरायचे आहे. परंतु या सामन्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबईच्या दोन खेळाडूंच्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे आणि दोघेही लंगडताना दिसले. आयपीएल प्लेऑफपूर्वीच मुंबईचे तीन खेळाडू टीम सोडून राष्ट्रीय टीममध्ये परतले आहेत. त्यातच आणखी दोन खेळाडू जखमी असण्े टीमसाठी चांगले लक्षण नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईचा फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) आणि आक्रमक फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) दोघेही लंगडताना दिसले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ते पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचू शकले नाहीत.
मुंबईचा सामना एलिमिनेटरमध्ये गुजरातशी आहे. गुजरातच्या टीमनं या सिझनमधील दोन्ही मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्यामुळे या मॅचपूर्वी दोन खेळाडू फिट नसणे हे काळजीचं कारण आहे.
खेळाडूंच्या दुखापतींचा टीमवर परिणाम
दीपक चहरला पहिल्यांदाच मुंबईने आयपीएल 2025 साठी आपल्या संघात समाविष्ट केले होते. तो सातत्याने आपल्या कारकिर्दीत दुखापतींशी झगडत आहे. दीपक चहर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसोबत मुंबई संघाच्या गोलंदाजी युनिटचा महत्त्वाचा भाग आहे. त्याला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. पायाला पट्टी लावल्यानंतर त्याने तीन ओव्हर बॉलिंग केली होती.
( नक्की वाचा : IPL 2025: मुंबई इंडियन्स यंदा राहणार ट्रॉफीपासून दूर, 'हा' विचित्र योग आहे कारण! )
गुजरात टायटन्सविरुद्धच्या महत्त्वाच्या एलिमिनेटरपूर्वी चहर आणि तिलक वर्मा दुखापतींशी झगडताना दिसत आहेत. दीपक आणि तिलक ज्या प्रकारे लंगडताना दिसले, त्यावरून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याची डोकेदुखी वाढली आहे.
तिलक वर्मालाही पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती आणि तोही संघासोबत मुल्लांपूरला जाताना अस्वस्थ दिसत होता. जर हे दोन्ही प्रमुख खेळाडू अनफिट झाले, तर त्याचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर होऊ शकतो. मुंबई आणि गुजरात या दोन्ही टीमसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण यात पराभूत होणारी टीम थेट स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.