Prithvi Shaw : 'मित्र नाही ते तर...' पृथ्वी शॉची कारकीर्द कुणामुळे बिघडली? स्वत:च दिली मोठी कबुली

Prithvi Shaw News : एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भविष्य मानलं जाणारा पृथ्वी शॉ आता टीममध्ये जागा मिळवण्यासाठी धडपडत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Prithvi Shaw : 'आपण भरकटलो होतो', अशी कबुली पृथ्वीनं दिली आहे.
मुंबई:

Prithvi Shaw News : एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भविष्य मानलं जाणारा पृथ्वी शॉ आता टीममध्ये जागा मिळवण्यासाठी धडपडत आहे. 25 वर्षांच्या पृथ्वीला मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीममधून वगळण्यात आलं. त्याचबरोबर विजय हजारे ट्रॉफीच्या टीममध्येही त्याला स्थान मिळाले नाही. आपलं नेमकं कुठं चुकलं? याबाबत पृथ्वीनं एका मुलाखतीमध्ये मोकळेपणाने सांगितले आहे. 'आपण भरकटलो होतो', अशी कबुली त्यानं दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पृथ्वीचा बॅड पॅच

पृथ्वी शॉने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केलं. त्यानं पहिल्याच टेस्टमध्ये 134 रन्स केले. त्यावेळी पृथ्वी शॉमध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवाग या तिघांचीही झलक दिसते, असं टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री म्हणाले होते. पण, नंतर पृथ्वीची कारकीर्द उतरणीला लागली.

Advertisement

गेल्या वर्षी आयपीएल 2025 साठी झालेल्या लिलावात त्याला कुणीही खरेदी केलं नाही. त्यानंतर अनेक टीममधील खेळाडू जखमी होऊनही त्याचा कुणी बदली खेळाडू म्हणून समावेश केला नाही. या सर्व विषयावर बोलताना पृथ्वीनं सांगितलं की त्यानं चुकीचे निर्णय घेतले आणि क्रिकेटला कमी वेळ दिला.  त्याने चुकीच्या मित्रांसोबत वेळ घालवला. आजोबाच्या निधनानंतर आपल्याला दु:ख झाल्याचं त्यानं सांगितलं. पण, आपण पुन्हा कष्ट करण्यास सुरुवात केली आहे. माझा स्वत:वर विश्वास आहे, असं पृथ्वीनं स्पष्ट केलं. 

Advertisement

( नक्की वाचा : IND vs ENG : पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर टीम इंडियात बदल, 'या' खेळाडूची हकालपट्टी )

काय म्हणाला पृथ्वी?

पृथ्वी शॉने एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्याकडून चुका झाल्या. त्याने सांगितले की, तो आधी क्रिकेटवर पूर्ण फोकस करत असे. नेटमध्ये 3-4 तास बॅटींग केली तरी त्याला थकवा जाणवत नसे. पूर्ण दिवस मैदानावर घालवत असे. पण नंतर त्याचे लक्ष विचलित झाले. पृथ्वी शॉ म्हणाला, 'अनेक गोष्टी आहेत. लोकांना हे वेगळे वाटू शकते. पण मला माहीत आहे की काय झाले. मी समजू शकतो. मी आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले. मी क्रिकेटला कमी वेळ देऊ लागलो. मी आधी खूप सराव करत होतो. जसे, मी नेटमध्ये 3-4 तास बॅटिंग करत असे. मी बॅटिंगने कधीच थकत नव्हतो. मी अर्धा दिवस मैदानावर जात असे. मी कबूल करतो की माझे लक्ष विचलित झाले होते.'

Advertisement

पृथ्वी शॉ कुणामुळे बिघडला? 

पृथ्वीने पुढे सांगितले की, त्याने अनावश्यक गोष्टींना महत्त्वाचे मानण्यास सुरुवात केली होती. त्याने काही चुकीचे मित्र बनवले होते. कारण तो त्यावेळी टॉपवर होता. त्याला मित्रांनी दुसरीकडं नेलं. त्यामुळे तो भरकटला. यापूर्वी तो मैदानावर 8 तास सराव करत असे, आता फक्त 4 तास सराव करतो.  

( नक्की वाचा : IND vs ENG : U19 टीमनं घेतला बदला, 50 ओव्हरमध्ये ठोकले 442 रन्स! ट्रक ड्रायव्हरच्या मुलाची वादळी सेंच्युरी )

पृथ्वी शॉने यावेळी त्याच्या कुटुंबातील एका दु:खद घटनेचाही उल्लेख केला. आजोबाच्या निधनाचं खूप दु:ख झालं असं तो म्हणाला. अनेक गोष्टी आहेत. फक्त हेच नाही. माझ्या कुटुंबात एक समस्या होती. माझ्या आजोबांचे निधन झाले होते. ते मला खूप प्रिय होते. अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मला ते जाणवते.' पृथ्वी शॉने आपल्या चुका मान्य केल्या. आपले वडील आपल्या नेहमीच पाठीशी उभे असल्याचं त्यानं सांगितलं. 

Topics mentioned in this article