सलग सुट्ट्यांमुळे कर्जत तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढल्याने कर्जत चार फाटा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नेरळ, माथेरान, कल्याण, आंबरनाथ, मुरबाड आणि मुंबई-पुणे मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. कर्जत चार फाट्यावरील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक होती. प्रत्येक विकेंड आणि सार्वजनिक सुट्टीत पर्यटकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी होतीये..