अवकाळी पाऊस अतिवृष्टी, पुराने झालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये राज्य सरकारने कपात केली आहे तसंच कमाल तीन हेक्टर ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच मदत देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारनं पूर्वीच निश्चित केलेले होते.