अकोल्याच्या पातुर तालुक्यातील बेलूरा खुर्द मधे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याने साठवून ठेवलेला कांदा हा भिजला आहे.. ज्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. अल्पभूधारक शेतकरी धम्मपाल इंगळे यांच्याकडे एकंदरीत दोन एकर शेती आहे.. दरम्यान शासन स्तरावर नाफेड बंद केलीय.. त्यामुळे नाफेड सुरू होईल आणि आपल्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्याने कांदा साठवून ठेवला.. मात्र दोन दिवसात वादळी वाऱ्याच्या मुसळधार पावसामुळे कांद्याला पावसाचे पाणी लागल्यामुळे कांदा अक्षरश: पूर्णता काळा पडलाये.. तर साठवणूक केलेल्या कांद्याला कोंब फुटायला सुरुवात झाली आहे.. त्यामुळे नाफेड सुरू करावे.. जेणेकरून इतर शेतकऱ्यांची नुकसान होणार नाही. आणि नुकसानाची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी ही केली जात आहे.