अकोला महानगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या बार्शीटाकळीच्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात सध्या १३.९ टक्के जलसाठा शिल्लक असल्यामुळे ५ दिवसाआड अकोला शहराला पाणीपुरवठा केला जाणारा.. आता तो ७ दिवसावर करण्यात आला आहे.. एकंदरीत पावसाळ्याचे दिवस असतानाही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस बरसला नाही.. जर एखादा महिना पावसाळा लांबणीवर पडल्यास अकोलेकरांना तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.. यावर अकोल्याच्या काटेपूर्णा महान प्रकल्प येथून सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी..