भारत आणि चीन या दोन शेजारी देशांमध्ये सीमेवर तयार झालेला तणाव निवळतो न निवळतो तोच ब्रम्हपुत्रा नदीवर तिबेटमध्ये चीन सरकार मोठं धरण बांधण्याची तयारी करत आहे. या धरणामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचं विश्लेषण