बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी पंचनाम्याच्या नावाखाली वेळ न घालवता सरकारने तातडीने सरसकट मदत करण्याची मागणी केली. “मी शेतकऱ्यांचे लेकरू म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. सरकारने त्वरित मदत केली नाही, तर आम्हाला कळवा,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.