काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'मोदींच्या राजीनाम्याचे संकेत मिळाल्यापासून फडणवीसांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडायला लागली आहेत,' असे ते म्हणाले. फडणवीसांनी तयारीही सुरू केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर महायुतीच्या नेत्यांनी सपकाळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.