हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाच्याही पंधरा दिवस आधी दाखल झालेल्या पावसानं मुंबईसह राज्यात सर्वदूर हजेरी लावली मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रांकडे पाठ फिरवल्यानं मुंबईचा पाणीसाठा आटत चालला आहे. मुंबईच्या तलावांमध्ये सध्या एक लाख एक्क्याण्णव हजार नऊशे बेचाळीस दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ तेरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.