महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले असून राज्यातील धरणांमध्ये केवळ २ ५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जून महिना सुरू झाला तरी मान्सून लांबल्यामुळे कडक ऊन आणि पाण्याच्या वाढत्या बाष्पीभवनामुळे धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता कमालीची वाढली आहे. मान्सून कधी धडकणार आणि धरण साठ्याची सद्यस्थिती काय? सविस्तर अहवाल या व्हिडिओमध्ये पहा!