नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटला नाहीये. अशवातच नाशिकमध्ये कुंभमेळा देखील होतोय यावरून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री येतात जातात पण त्यामुळे काही अडलंय का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय. तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरून काही अडलं नाहीये कारण काम होतच नाहीयेत असा पलटवार संजय राऊत यांनी लगावला आहे.