बातमी हिंगोलीतून आहे. पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईच्या रकमेतून राज्य सरकारनं कपात केली आहे. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. मात्र नुकसानग्रस्त शेती पिकांचे अजूनही पंचनामे झाले नाहीयेत. तर आमच्या शेती पिकांच्या मालाला योग्य भाव द्या आम्हाला नुकसान भरपाईची आवश्यकता राहणार नसल्याचं हिंगोलीतील शेतकऱ्यांनी मत व्यक्त केल आहे.