भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतलाय.त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो, तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याची घोषणा गणेश नाईक यांनी मंगळवारी केली.दरम्यान यावरुन संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढलाय. गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेत असतील तर शिंदेंनी नवी मुंबईत फिरावं, मात्र शिंदे रुसून बसलेयत असं राऊत म्हणाले.