पावसानं कांदा पिकाला मोठा फटका बसलाय आहे. शेतातील आणि शेतात काढून ठेवलेला वीस टक्के कांद्याचं नुकसान झालंय. मात्र यंदा कांद्याचे एकशे वीस टक्के इतके बंपर उत्पादन झालंय त्यामुळे भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे दर वाढतील अशी कुठलीही शक्यता नाही.