आघाडीबद्दल MIM चे नेते इम्तियाज जलील यांनी सूचक वक्तव्य केलंय. तसा प्रस्ताव आला तर आम्ही नक्की विचार करू असं जलील यांनी म्हटलंय. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने दोन दोन तास उन्हामध्ये उभे राहून कुणाला मतदान केले? भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन आम्हाला नरेंद्र मोदी साहेब नको पाहिजे म्हणून कोणाला मतदान केले, उद्धव साहेबांना केले, शरद पवार साहेबांना केले, काँग्रेस पक्षांना केले आणि त्याचा तुम्हाला काय मिळालं, फळ काय मिळालं की तुमच्या विधानपरिषदेमध्ये जे एक दोन होते आमदार तेही गेले.