भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांची एक बैठक झाली या बैठकीत जैश ए मोहम्मदशी संबंधित दोनशेहून अधिक दहशतवादी आणि कमांडर सहभागी झाल्याचं वृत्त आहे. या बैठकीचा उद्देश भारताकडून सूड घेणं हा होता. ही बैठक एका मोकळ्या मैदानात तंबू उभारून झाली. या बैठकीत जैश व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रांतांमधून लष्करच्या अनेक दहशतवादी आणि कमांडर्स ना बोलावण्यात आलं होतं.