दापोली मतदारसंघातील आढावा बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 'तुमचं नक्की चाललंय काय?' असा सवाल करत त्यांनी रखडलेल्या वीज जोडण्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढच्या सहा दिवसांत सर्व अर्ज निकाली काढून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. घरकुल योजनेच्या कामातील दिरंगाईवरही त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.