आता देशभरात समान टोल आकारला जाणार.वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार.मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहेत, येत्या काळात देशभरात समान टोल आकारला जाणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी आणि वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.