राज्यात 50 वर्षांनंतर मद्यविक्री परवान्यांवरील स्थगिती उठवल्यानंतर 328 पैकी तब्बल 96 परवाने राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनी मिळवल्याचे समोर आले आहे. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. यावरुन अंजली दमानिया ह्या आक्रमक झाल्या आहेत.